धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा बृहत आराखडा

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या रूपाने धारावीतील रहिवाशांना आपल्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्याची एक अतुलनीय संधी मिळाली आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर क्षेत्रातील विकासाचा आकृतीबंध बदलणारा प्रकल्प ठरणार आहे. धारावीतली विविधता, उद्यमशीलता आणि विविध समुदायांचा एकोपा हा धारावीचा आत्मा आहे. नियोजित मास्टर प्लॅनमध्ये देखील धारावीचा हा आत्मा जपला जाईल.

धारावी अधिसुचित क्षेत्रासाठी तयार करण्यात आलेला मास्टर प्लॅन हा धारावीच्या पुनर्विकासाचे व्हिजन प्रत्यक्षात आणणारा एक दीर्घकालीन मार्गदर्शक आराखडा ठरू शकेल. विकास नियमांचा सखोल आढावा, सर्व संबंधितांशी सुसंवाद, सर्वेक्षण, सद्य स्थितीतील विकासाची माहिती आणि स्थानिकांच्या आर्थिक गरजा या सर्व बाबी लक्षात घेऊन हा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे.

शहरी संदर्भाचे तपशीलवार विश्लेषण, विकास आराखडा, धारावीतील अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी प्रस्ताव, गृहनिर्माण, दळणवळण, भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधा या घटकांचा एकत्रित अंतर्भाव या मास्टर प्लॅनमध्ये करण्यात आला आहे. धारावीचा समृध्द सांस्कृतिक वारसा आणि स्थानिकांचे हीत लक्षात घेऊन धारावीचा पुनर्विकास करण्याचे उद्दिष्ट आहे. या पुनर्विकास प्रकल्पातून धारावीकरांना दर्जेदार सदनिका, उत्तम सामाजिक आणि पायाभूत सुविधा, अद्ययावत आरोग्य सुविधा आणि शैक्षणिक सुविधा देऊन त्यांच्या जीवनमानाचा दर्जा वाढविण्याचा मानस आहे. हा मास्टर प्लॅन तयार करताना सर्वांगीण विकासासह रहिवाशांना रोजगाराच्या समान संधी, सार्वजनिक सुविधा आणि मोकळ्या जागा उपलब्ध होतील, यावर भर देण्यात आला आहे.

मास्टर प्लॅन मधील महत्त्वाची उद्दिष्ट्ये :

  • पुनर्विकास आणि रोजगाराची सांगड
    निवास आणि रोजगार यांची सांगड घालणाऱ्या धारावीच्या संमिश्र अद्वितीय परिसंस्थेचे जतन करणे.

  • धारावीतील रहिवाशांच्या दीर्घकालीन आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन
    औद्योगिक आणि व्यावसायिक गाळेधारकांच्या क्षमतावृद्धीसाठी धोरणात्मक नियोजन करणे.

  • धारावीतील रहिवाशांच्या दीर्घकालीन आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन
    औद्योगिक आणि व्यावसायिक गाळेधारकांच्या क्षमतावृद्धीसाठी धोरणात्मक नियोजन करणे.

  • मुंबईकरांच्या वापरासाठी सार्वजनिक भूखंड
    नियोजनबद्ध रीतीने धारावीत मोकळ्या सार्वजनिक जागा विकसित करणे. या मोकळ्या जागांचा वापर केवळ धारावीतील रहिवाशीच नाही तर सगळ्या मुंबईकरांना देखील होऊ शकेल.

  • सुलभ दळणवळणाची साधने उपलब्ध करून देणारा विकास
    सुलभ दळणवळणासाठी नियोजनबद्ध रितीने पुनर्वसन करण्यात येईल.महत्त्वाच्या स्थानकांना जोडणारे पादचारी मार्ग आणि वाहन विरहित रस्ते यामुळे रहिवाशांना दळणवळणाच्या अद्ययावत सुविधांपर्यंत सुलभतेने पोहोचणे शक्य होईल.

  • मानवकेंद्रीत विकास आराखडा
    स्थानिक पादचाऱ्यांना चालण्यासाठी प्रोत्साहन देणारे वाहन विरहित रस्ते यांसह अनेक भौतिक आणि नेत्रसुखद मानवकेंद्रित विकास आराखडा तयार करणे.

  • स्मार्ट सिटी आणि शाश्र्वत विकास
    सार्वजनिक ठिकाणे आणि रस्ते यांचा उभारताना निसर्ग आणि हरित क्षेत्र यांच्याशी सांगड घालून पर्यावरणपूरक विकास केला जाईल. सार्वजनिक ठिकाणे अशा पद्धतीने विकसित केली जातील, जेणेकरून स्थानिक प्रजातींचा अधिवास जपला जाईल आणि लोकांनाही पुरेशी सावली मिळू शकेल. हवामान बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी स्थानिक नाले, पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील जागा आणि स्थानिक पायाभूत सुविधा यांचा नैसर्गिकरित्या विकास करण्यात येईल.